HomeUncategorizedमिर्झापुर नेरीचे ग्रामसचिव राजु शे़ंदरे, राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत...

मिर्झापुर नेरीचे ग्रामसचिव राजु शे़ंदरे, राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित…!!

प्रतिनिधी मुंबई

** श्री राजू गोवर्धन शेंदरे राज्य स्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित..*
“महामहिम राज्यपाल सी . पी. राधाकृष्णन यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले”

दि. 27/05/2025 ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मंत्रालय , मुंबई येथे भव्य दिव्य अशा ग्राम विकास विभागाने आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमात महामहिम राज्यपाल श्री सी .पी .राधाकृष्णण यांचे हस्ते श्री राजू शेंदरे व त्यांची पत्नी सौ जयश्री शेंदरे यांचा सपत्नीक मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी ग्राम विकास मंत्री मा. जयकुमार गोरे, ग्राम विकास राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रमाणपत्र प्रदान केले.
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत ग्राम विकास क्षेत्रातील उत्कृष्ट ,उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बाबतीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
श्री राजू शेंदरे यांचे कार्यकाळात ग्राम पंचायत बाजारवाडा ला जलसमृद्ध गाव राष्ट्रीय पुरस्कार तसेच ग्राम पंचायत मिर्झापुर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे व विदर्भातील पहिले सोलर ग्राम जाहीर झाले आहे.
तसेच त्यांना विविध सामाजिक संघटना व संस्थे व्दारे त्यांचा विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

    त्यांना  त्यांचे कार्यकाळात खालील प्रमाणे पुरस्कार मिळाले आहेत

   कार्यलयीन पुरस्कार-

1) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार (विभागिय)
2) स्मार्ट ग्राम अभियान पुरस्कार (जिल्हा स्तरीय)
3)सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार (जिल्हा स्तरीय)
4)मिशन समृद्धी पुरस्कार (जिल्हा स्तरीय, चेन्नई सरकार)
5)निर्मल ग्राम पुरस्कार(भारत सरकार)
6)माझी वसुंधरा अभियान पुरस्कार4.0( महाराष्ट्र राज्य स्तरीय)

  वैयक्तिक पुरस्कार-

1) जल मित्र पुरस्कार (डॉ सचिन पावडे यांचे वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा संघटने द्वारे)
2) समाज मित्र पुरस्कार-( आदर्श एकता सामाजिक गृप आर्वी द्वारे)
3)जिल्हा स्तरीय आदर्शग्रामसेवक पुरस्कार (जिल्हा परिषद वर्धा द्वारे)
4) राज्य स्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार ( ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन)
5) कोरोना योद्धा पुरस्कार (योगेश्वरी बहुउद्देशीय सामाज विकास संस्था पुलगाव)
6)उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार( पंचायत समिती आर्वी द्वारा)
7) गौरव जलरत्ननांचा (पाणी फाऊंडेशन मुंबई अंतर्गत)
राज्य स्तरीय आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार मिळाल्या बाबत त्यांनी सर्व सहकारी मित्र व वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले व या यशाचे श्रेय त्यांचे आई, वडील , पत्नी ,त्यांचे गुरुजन ,सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांचे कार्यालयीन सर्व कर्मचारी व ग्रामवाशी बंधू भगिनी यांना देतात.

RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
35.6 ° C
35.6 °
35.6 °
31 %
1.1kmh
40 %
Thu
37 °
Fri
39 °
Sat
42 °
Sun
43 °
Mon
44 °

Most Popular