


आर्वी तालुका प्रतिनिधी
नितीन आष्टीकर
आर्वी विधानसभा क्षेत्रात विकासात्मक कामाला चालना भारत आपला अमृत महोत्सव साजरा करताना आर्वी विधानसभा क्षेत्रात इतिहास घडविला. देश स्वातंत्र्य झाल्या पासून न घडणारी घटना घडून नवीन इतिहास लिहिला जात आहे, व हा इतिहास कधीही न पुसणारा असेल असं म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आर्वी विधानसभा क्षेत्रात आज रोजी एक खासदार व दोन आमदार होणे हे एक आठव्या अजूबा पेक्षा कमी नाही. या तिन्ही नेत्यामुळे आर्वी विधानसभा श्रेत्राच्या विकासाला सुपर गती मिळत आहे. यात किंचितही शंका नाही. आमदार मा. श्री सुमित वानखेडे हे आर्वी विधानसभा क्षेत्रात नावीण्य पुर्ण अकल्पनीय योजना क्षेत्रात आणत आहे. तरंगणारा विद्युत प्रकल्प तसेच NCDEX स्टॉक एक्सचेंज सारखे अकल्पनीय प्रकल्प विधानसभा क्षेत्रात आणून बेरोजगारांना रोजगार निर्माण करून रोजगारांची संधी उपलब्ध देत आहे .त्यांची काम करण्याची सैली हे अकल्पनीय असून त्याला मूर्त रूपात आणणे हेही जिकिरीचे काम आहे. आमदार मा. श्री दादारावजी केचे हे सुद्धा विकास कामात कसे मागे राहतील !! .त्यांनी पण विकासाला चालना देण्यासाठी 13 ते 14 कोटीचे कामे आणुन मी पण विकास कामात मागे नाही हे सिद्ध केले .या 13 ते 14 कोटी कामांमध्ये विधानसभा क्षेत्राचे नाली, मुख्य रस्ते व ग्रामीण रस्ते, मार्ग यांचे एक जाळे विणून बेरोजगारांना येण्या जाण्या साठी सोय करून देत एक आदर्श निर्माण केला. खासदार मा. श्री अमर काळे हे सुद्धा आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावे म्हणून ते पण अग्रेसर आहे. त्यांनी पण विकास कामाचे झडी लावत आर्वी शहरातील रेल्वेचा अनेक वर्षापासून चा प्रलंबित मुख्य मुद्दा हातात घेत त्याला मूर्त रूप आणे पर्यंत ते गप्प बसणार नाही .हे तितकेच खरे. आर्वी शहरात रेल्वे चालू झाल्यास बरेच बेरोजगारांना नवीन रोजगार ची संधी मिळेल तसेच विकासात्मक ,गती निर्माण होईल. रेल्वे मुळे आर्वी शहर भारतीय रेल्वेच्या नेटवर्क मध्ये जोडले जाईल. रेल्वे हा औद्योगिक विकास क्षेत्रातील बेरोजगारी व गरिबी उन्मूलन साठी महत्त्वाचा कणा आहे. रेल्वेमुळे कृषी व उद्योग यांच्या विकासाला चालना मिळेल तसेच उद्योगाला विनिर्माण कार्यात गती प्राप्त होईल . निर्मित वस्तूचे निर्यात साठी व्यापार व वाणिज्य चा विस्तार होईल कच्चामाला चा पुरवठा लवकर करून समृद्ध व विकसित होईल .रेल्वे लागत प्रभावी ,पर्यावरण अनुकूल, उच्च वाहन समता, विश्वसनीयता, सुरक्षा आदी प्रदान करते. आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार व आमदार यांनी कामाचा सपाटा चालू केला आहे .पण या विकास कामाला आर्वी तळेगाव रस्त्यासारखी गत न होता. खरोखरच विकास कामे झाले पाहिजे असे आर्वी विधानसभा क्षेत्रातील जनतेला आजघडीला तिन्ही लोकप्रतिनिधी कडून मोठ्या अपेक्षा आहे…!!